Wednesday, 10 December 2014

गोवंशाची वैज्ञानिक व्यापारिक आणि पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून महत्त्व

गाईच्या दुधाशी भले कोण परिचित नाही, त्याचे महत्त्व पाहून त्याला सर्वोत्तम आहाराचा दर्जा दिला गेला आणि त्याची तुलना अमृताशी केली गेली. गाईच्या दूधात अशी अनेक विशेषता आहे जी इतर कोणत्याही अन्य प्राण्याच्या दूधात नाही. त्यात सोन्याचा अंश असतो की ज्यामुळेच त्याचा रंग सोन्यासारखा पिवळा असतो.  केवळ गाईच्या दुधातच “अ” जीवनसत्त्व आढळते आणि आपल्या विशेष गुणधर्मामुळे ते शरीरातील विषारी घटकांचा नायनाट करते तसेच, कर्करोगाच्या पेशींनाही समाप्त करते. गाईच्या तुपाची यज्ञात आहुती दिल्याने वातावरणातील जीवजंतू नष्ट होतात. गाईचे गोबर (शेण) जाळल्यामुळे एका परिसरातील तापमान कधी विशिष्ट तापमानाच्या सीमेवर जात नाही. भोजनातील पोषक तत्व ही समाप्त होत नाहीत आणि धुरामुळे हवेतील विषाणूचा नाश होतो. गाईच्या शेणापासून बनविलेल्या खतामध्ये nitrogen 0 .5-1 .5 % ,phosphorous 0 .5 -0 .9 % आणि potassium 1 .2 -1 .4 % असते जे रासायनिक खतांसमान आहे आणि जे पिकावर विषारी प्रभाव टाकीत नाही. हे प्रभावशाली प्रदूषण नियंत्रक आहे. गाईच्या शेणामुळे सूर्याच्या अतिनील किरणांपासून ही बचाव होवू शकतो. गोबर पिरामीड मुळे भरपूर मोठ्या प्रमाणात सौर उर्जेचे अवशोषण संभव आहे.तलावात गाईचे शेण टाकल्याने पाण्याचा आम्ल प्रभाव कमी होतो. शेणाचा शिडकावा केल्याने कचऱ्यातील दुर्गंध नाहीसा होतो. लाखो वर्षांपासून शेणाचे खत वापरल्याने जमिनीची सुपीकता संपली नाही परंतु, आत्ता ६० ते ७० वर्षात रासायनिक खतांच्या प्रयोगामुळे लाखो हेक्टर जमीन नापीक झाली आहे. आजही हिरोशिमा नागासाकी येथील रहिवासी परमाणू किरणांपासून सुरक्षेसाठी गोरस पाण्यात भिजविलेले पांघरूण वापरतात.गोमुत्रामध्ये कडुलिंबाच्या पानांचा रस टाकून एक अतिशय प्रभावी हानीरहित जैव कीटकनाशक तयार होते जे झाडांची वाढ, कीटनियंत्रक व कीटनाशकाचे काम करते. गोमूत्र पर्यावरणाची पूर्ण शृंखला शुद्ध करण्याचे काम करते.गोमुत्राचा अर्क फ्ल्यू, गाठी, रासायनिक कुप्रभाव, लेप्रसी, स्तन कर्करोग, हेपीटीटीस, अल्सर, हृदयरोग, गैस, अस्थमा यांसारख्या रोगांची वाढ रोकण्यास व नष्ट करण्याचे काम करते. गोमूत्र हे केसांसाठीही उत्तम कंडीशनरचे काम करते. प्रत्येक वर्षी पशुधनामुळे ७० लाख पेट्रोलियम ची बचत होते. ६० अब्ज रुपयांचे दूध प्राप्त होते, ३० अब्ज रुपयांचे जैविक खत प्राप्त होते, २० कोटी रुपयांचा बायोगैस प्राप्त होतो. हे आकडे स्वतःच दर्शवतात की, गोमातेचे राष्ट्रीय उत्पन्नाच्या वृद्धीत किती महत्त्वाचे स्थान आहे. “आठ ऐश्वर्य घेवून लक्ष्मी गाईमध्ये निवास करते” या सांगण्याचा गुढार्थ राष्ट्रलक्ष्मी कडे संकेत करतो जे आपण वरील आकड्यांवरून पाहिले मग असे आहे तर, आपली ही जबाबदारी नाही का बनत की, आपण पुन्हा गोमातेचे ते वंदनीय स्वरूप जनमानसात प्रस्थापित करू जेणेकरून आपला भारत देशात पुन्हा सोन्याचा धूर निघू शकेल.“कृषी आणि ग्रामीण अर्थव्यवस्था पूर्णता गोवंशावर आधारित आहे. जे लोक यांत्रिकीकरणाची शेती व तथाकथित वैज्ञानिक संसाधनाची स्वप्ने पाहतात ते अवास्तविक संसारात राहतात” - लोकनायक जयप्रकाश नारायण

No comments:

Post a Comment