Wednesday, 10 December 2014

आपल्या देशातून पुन्हा एकदा सोन्याचा धूर निघेल

“मी गाईची पूजा करतो. संपूर्ण समाजाने जरी तिच्या पूजेला विरोध केला तरीही मी गाईला पूजेन. गाय जन्मदात्या आईहूनही थोर आहे. आमचे असे मानणे आहे की, ती लाखो व्यक्तींची माता आहे.” - महात्मा गांधी

गोमातेमध्ये ३३ करोड देवी देवतांचा वास असतो. त्यामुळे गोमाता आमच्यासाठी पूजनीय आहे. परंतु या धार्मिक आधारावर गोमातेस तिचे योग्य स्थान मिळाले आहे? नाही. उलट आज अशी वेळ आहे की, आजच्या (तथाकथित) वैज्ञानिक व व्यापारीकरणाच्या युगात या गोष्टीवर विचार केला गेला तर कदाचित तिचे हे मानसपुत्र स्वार्थ भावाने  का होईना परंतु तिच्या हत्या करण्याच्या पापातून तरी वाचू शकतील.संपूर्ण प्राणीजगतात गाईचे एक वेगळे आणि महत्त्वपूर्ण स्थान आहे. हे स्थान ज्ञान व विज्ञान संमत आहे, ज्ञान व विज्ञान यांच्या नंतर अध्यात्माचा तर विषय येतोच. अश्या प्रकारे ज्ञान, विज्ञान व अध्यात्म या तीन समान रेषांचे सम्मीलन होवून जो त्रिभुज बनतो त्यास गाय असे म्हणतात. विद्वानांनी गायीला साक्षात पृथ्वी स्वरूपा म्हंटलय. या जगताचा भार जी सांभाळते आणि जी विश्वात संपूर्ण गुणांची खाण आहे तिचेच नाव गाय आहे.
आपल्या पूर्वजांनी हे सत्य जाणले होते आणि गोसेवेस आपला धर्म बनविला होता की, ज्याच्या फलस्वरूपच आपला देश “सोन्याचा धूर देणारा” असा बनला होता आणि म्हंटले गेले होते “सर्वे देवा स्थिता देहे, सर्व देवमयी हि गौ” परंतु आपल्याला याचा विसर पडला. ही तर भारताच्या अधःपतनाची पराकाष्टा आहे की,  स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही वंदनीय अश्या आमच्या गोमातेचा गोमांस व्यापार दिवसेंदिवस वाढतच चाललेला आहे. गोमांसाचा आंतरिक उपयोग वाढतच चाललेला आहे.  बीफ खाणे म्हणजे आजच्या आधुनिक जगाची ओळख झालेली आहे. क्त्त्लखान्यांचे आधुनिकीकरण केले जात आहे, दररोज नवनवीन  कत्तलखाने उघडले जात आहेत. असे वाटते आहे की, स्वतःकलीयुगानेच गोवंश विनाश करण्याचा प्रण घेतला आहे. इंग्रजांनी गोचर भूमी हडपण्यासाठी जी धूर्तनीती वापरली आम्ही आजही त्यातच अडकून पडलो आहोत. आधुनिक अर्थशास्त्रानेही हिंन्दुस्थानातील गोवंश विनाशच्या बाबतीत आपले विरोधी मत दर्शवून आणखीनच चालना दिली. डॉक्टर राव, मुखर्जी, नानालती आणि अंजारिया यांच्या विचारांचा प्रसार केला गेला ज्यांनी म्हंटले की, गोवंश हे भारतावर ओझे आहे.“७०% भारतीय गाई दुध देत नाहीत. शेतीसाठी बैल उपयुक्त नाहीत” जे पूर्णपणे असत्य आहे. तर भारतीय अर्थशास्त्रज्ञ मसलन डॉक्टर राईट यांच्या अनुसार १९४० च्या दशकातील रुपयाच्या अनुसार फक्त गाय आणि बैल यांपासून मिळणारे दूध, दूधाचे पदार्थ, हड्डी तसेच चामडे खते यांच्या माध्यमातून एक हजार दहा करोड एवढ्या किमतीची मिळकत होते. ही तर एक विचारपूर्वक केलेली धूर्तनीती आहे जी भारतीय गोवंशाच्या विनाशासाठी तयार केली गेली आहे. मसलन डॉक्टर राईट यांच्या अनुसार इकडील शेतकऱ्यांना ते म्हणतात इकडील गाई फक्त ६०० पौंड दूध देतात तर विदेशी संकरित गाई ५००० पौंड दूध देतात.शेवटी एक गोष्ट तर निश्चित आहे की, “आधुनिक तसेच इंग्रज विद्वानांनी खूपच सुनियोजित पद्ध्तीने भारतीय गोवंशाला क्त्त्लखान्यांकडे ढकलण्याचा प्रयत्न केला” आज स्थिती अशी आहे की, अत्यंत उपयोगी आणि ऐन उमेदीतील आमचा पवित्र गोवंश क्त्त्लखान्यांकडे पाठविला जात आहे. आचार्य विनोबा भावे यांनी तर गोवंशाच्या प्राणाची रक्षा करण्यासाठी स्वतःचे प्राण त्यागले परंतु खेदाची गोष्ट अशी की, त्यांच्या बलिदानाचा सर्वांस विसर पडला.

No comments:

Post a Comment